PM Kisan Yojana 2025: ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही पुढचा हप्ता – त्वरित करा ही 3 कामं!

WhatsApp Group Join Now

PM Kisan Yojana 2025 बाबत शेतकऱ्यांसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांत मिळणारी PM Kisan Yojana मदत यंदा काही शेतकऱ्यांना मिळणार नाही. कारण काही आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यास, पुढचा हप्ता थांबू शकतो.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दु:खद बातमी!

आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे, आणि म्हणूनच शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यातच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) आणि राज्यातील नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाच्या आहेत.

या दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांना एकूण ₹12,000 चं आर्थिक सहाय्य दिलं जातं – केंद्र सरकारकडून ₹6000 आणि राज्य सरकारकडून ₹6000. पण यामध्ये एक अट आहे – काही आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास, PM Kisan Yojana चा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही.

PM Kisan Yojana हप्ता मिळवण्यासाठी ‘ही’ 3 कामं त्वरित पूर्ण करा

जर तुम्हाला PM किसान योजनेचा पुढचा हप्ता (20वा हप्ता) मिळवायचा असेल, तर ही तीन कामं वेळेत पूर्ण करणं अनिवार्य आहे:

1) ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करा

  • पीएम किसान योजना अंतर्गत ई-केवायसी करणं आवश्यक आहे.
  • ही प्रक्रिया तुम्ही pmkisan.gov.in या वेबसाइटवर OTP किंवा बायोमेट्रिकद्वारे करू शकता.
  • ई-केवायसी न केल्यास तुमचं नाव थेट यादीतून वगळलं जाऊ शकतं.

2) बँक खाते अद्ययावत (Updated Bank Account) ठेवा

  • तुमचं बँक खाते आधारशी लिंक असणं गरजेचं आहे.
  • जर खाते बंद, निष्क्रिय किंवा चुकीचं असेल, तर हप्ता ट्रान्सफर होणार नाही.
  • खातं सुरु आणि चालू स्थितीत असावं, ही खात्री करून घ्या.

3) जमिनीच्या नोंदी (Land Records) तपासा

  • PM किसानचा लाभ भूमीधारक शेतकऱ्यांनाच दिला जातो.
  • जर तुमचं नाव 7/12 उताऱ्यावर नसेल, किंवा तुम्ही भूमिहीन असाल, तर तुम्ही अपात्र ठरता.
  • म्हणून, तुमचं नाव नोंदीत आहे का हे तपासा.

PM Kisan 20वा हप्ता कधी मिळेल?

  • अद्याप 20व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही.
  • मात्र, जुलै 2025 पूर्वी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
  • पण याआधी वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झालेल्या असाव्यात.

हे काम केलं नसेल तर नुकसान होणार!

ज्यांनी अद्याप ई-केवायसी, बँक खाते अपडेट, किंवा जमीन नोंदणीचं काम केलं नसेल, त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही.

तुमचं नाव लाभार्थी यादीतून वगळलं जाऊ शकतं, म्हणून ही कामं आजच पूर्ण करा आणि तुमचा हक्काचा हप्ता मिळवा!

शेतकरी मित्रांनो, ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. वाट्सअप, फेसबुक आणि ग्रुप्समध्ये शेअर करा. अधिक माहितीसाठी mahayojanaa.com या वेबसाइटला नक्की भेट द्या!

Free Tab Yojana 2025: आता विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब आणि दररोज 6GB इंटरनेट!

Leave a Comment

योजना ग्रुप जॉईन करा !