राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने महिलांच्या आरोग्य आणि पोषणासाठी सुरू केलेल्या PM Matrutav Yojana अंतर्गत आता गरोदर महिलांना 6000 रुपये अनुदान मिळणार आहे. ही योजना खास करून गरोदर असलेल्या महिलांसाठी तयार करण्यात आली असून, त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्याचा सरकारचा उद्देश आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (Pradhanmantri Matru Vandana Yojana) ही योजना 2017 पासून सुरू करण्यात आली आहे. योजनेचा मुख्य हेतू म्हणजे गरोदर महिलांना नियमित आरोग्य तपासणीसाठी आणि पोषक आहारासाठी आर्थिक मदत देणे. यामध्ये महिलेला पहिल्या गर्भधारणेसाठी एकूण 5000 रुपये टप्प्याटप्प्याने दिले जातात. त्याशिवाय इतर योजनांद्वारे अजूनही 1000 रुपये मिळवता येऊ शकतात, म्हणजे एकूण 6000 रुपये मिळू शकतात.
या योजनेचा लाभ कोणाला मिळतो?
या योजनेचा लाभ गरोदर महिलांना आणि पहिल्यांदा बाळंत होणाऱ्या महिलांना दिला जातो. महिलेला सरकारी आरोग्य केंद्रावर तपासणी करून घेतल्याचे पुरावे लागतात. शासकीय दवाखान्यातील नोंद, आधार कार्ड, बँक खात्याचा तपशील ही कागदपत्रे लागतात.
अर्ज कसा करायचा?
PM MATRUTAV YOJANA साठी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे करता येतो. जवळच्या आंगणवाडी केंद्रावर किंवा आरोग्य केंद्रावर जाऊन फॉर्म भरता येतो. तसेच काही राज्यांमध्ये ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
महाराष्ट्रातील योजनेची प्रगती
वित्त वर्ष 2024-25 साठी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये ५ लाख ६८ हजाराहून अधिक महिलांना या योजनेत सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यामध्ये सध्या ५ लाखांहून अधिक महिलांनी नोंदणी केली आहे.
२०१७ पासून ते मार्च २०२४ पर्यंत या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील ३५ लाख महिलांनी घेतला आहे आणि एकूण १३८८ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. ही योजना म्हणजे महिलांच्या आरोग्य आणि पोषणासाठी एक मोठे पाऊल आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना – गर्भवती महिलांसाठी मिळणार 6000 रुपये!
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PM Matrutav Yojana) ही केंद्र सरकारने 1 जानेवारी 2017 पासून सुरू केलेली एक खास योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गर्भवती महिलांना गर्भधारणेपासून बाळंतपणापर्यंत आवश्यक आरोग्य सेवा, तपासण्या आणि आर्थिक मदत देणे, जेणेकरून कुपोषण कमी व्हावे आणि माता-बालकांचे आरोग्य सुधारावे.
गर्भवती महिलांना काय फायदे मिळतात?
या योजनेतून महिलांना वेळेवर आरोग्य तपासण्या करून घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. गर्भधारणेच्या 3 ते 6 महिन्यांच्या दरम्यान, महिला जवळच्या सरकारी दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा मान्यताप्राप्त खासगी हॉस्पिटलमध्ये तपासणी करू शकतात.
या तपासण्यांमध्ये हिमोग्लोबिन, ब्लड प्रेशर, शुगर लेव्हल, वजन, आणि इतर गरजेच्या तपासण्या मोफत केल्या जातात. यामुळे माता मृत्यूदर आणि नवजात बाळांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
लाभ किती आणि कसा मिळतो?
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत एकूण ₹5,000 अनुदान दिले जाते, जे तीन हप्त्यांमध्ये मिळते:
- पहिला हप्ता ₹1,000 – जेव्हा गर्भवती महिला आंगणवाडी केंद्र किंवा सरकारी आरोग्य केंद्रावर नोंदणी करते.
- दुसरा हप्ता ₹2,000 – सहाव्या महिन्यानंतर, किमान एक अँटी-नॅटल चेक-अप (ANC) पूर्ण केल्यावर.
- तिसरा हप्ता ₹2,000 – बाळाच्या जन्मानंतर, जन्म नोंदणी झाल्यावर आणि बाळाने BCG, OPV, DPT आणि हिपॅटायटिस-B लसीकरणाचा पहिला डोस घेतल्यावर.
याशिवाय, जर बाळंतपण सरकारी दवाखान्यात (संस्थात्मक प्रसुती) झाले असेल, तर जननी सुरक्षा योजना (JSY) अंतर्गत अजून ₹1,000 अतिरिक्त मदत मिळू शकते. यामुळे महिलेला एकूण ₹6,000 पर्यंतची आर्थिक मदत मिळते.
टिप: ही योजना शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व गरोदर महिलांसाठी आहे. जर तुम्ही पात्र असाल, तर लवकरात लवकर जवळच्या आंगणवाडी किंवा आरोग्य केंद्रावर संपर्क करा आणि अर्ज करा.
Falbag Yojana 2025 | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! फळबाग योजनेत मिळणार 3 लाख रुपये – आत्ताच अर्ज करा!